टीप:-
कवितेच्या नायकाचे एका अहंकारी मुलीवर प्रेम जडले पण ...
त्यास ती मात्र सतत खेळवत राहते आहे , तिचे प्रेम मोकळेपणा ने व्यक्त करत नाही !
ह्यामुळे त्रासून एके दिवशी तो त्याच्या भावना व्यक्त करतो आहे अशी
हि कविता लिहिण्यामागची कवीची कल्पना आहे !
---------------------------खूप हट्टी, स्वत:चेच घोडे
सतत पुढे दामटवणारी ,
अविश्वासून माझे म्हणणे
कधी न मानणारी !
स्वत:स वेगळे मानून
कोशात आपल्याच राहणारी ,
अहंकारी पण वरून प्रेमळ,
सात्विक, सुस्वभावी दर्शविणारी !
खरं सांगू , मनमोकळे मजजवळ
कधी तू झालीच नाहीस ,
भावना स्वत:च्या कधी मज
जवळ मुक्त केल्यासच नाहीस !
"प्रेम कि मैत्री" हे कधी
स्पष्ट व्यक्त केलेसच नाहीस ,
हक्काने माझ्यावर रागावण्याचे मात्र
तू कधी सोडलेच नाहीस !
प्रेम अपेक्ष्ण्या आधी स्वत:हून
कधी तू दिलेच नाहीस,
मान्य मला, मुली स्त:हून
प्रेम व्यक्त करीत नाहीत !
पण दुसर्याने व्यक्त केल्यावर
' अधांतरी " कधी वागत नाहीत ,
समोरच्यास कस्पटा समान वागणूक
तुझ्यासाखी कुणी देत नाहीत ... !!
खरं सांगू , तू प्रेम
काय अजून जाणलेसच नाही ... !
---- संजय कुलकर्णी.

No comments:
Post a Comment