सांग उठसुठ का मजसी भांडशी ?
हट्टीपणा तू किती ग करशी ?
सहन न होवून तुझे असे वागणे
निघून गेलो मी तर काय करशील ?
दिनरात तू कुणास ग स्मरशील ?
पाहून आरशात कसे ग लाजशील ?
वाट सारखी कुणाची मग बघशील ?
लाडात येवून कुणाशी ग बोलशील ?
एकाकीपण सारखे तुज खायला उठेल,
कातरवेळी आभाळ जसे भरून येईल !
वीज पावसाळ्यात गडगडासह जशी चमकेल
घाबरून तेव्हा सांग कुणास बिलगशील ?
मधुर आठवांत कुणाच्या ग जाशील ?
स्मरून अपुल्या त्या धुंद भेटींना
आसवे एकटीच तेव्हा ढाळत बसशील !
उणीव मम प्रेमाची तुज सतत भासेल
बोल हे माझे तेव्हा तुजला पटतील
गीत नकळत माझे तू जसे गाशील
'प्रेम शब्दातून जाणवून माझे, भेटण्यास व्याकूळ होशील ...!!
---संजय कुलकर्णी.
asach asata na prem! hurhur lavnara!ani najresamor naslyavar vyakul karnara!
ReplyDeleteअगदी खरं आहे तुझे म्हणणे माधुरी !
ReplyDeleteपण तरीसुद्धा प्रेयसी असा हट्टीपणा व
अहंकारी पणा का करतात ?
त्यामुळे प्रियकराला सुद्धा वाईट वाटते
ह्याची त्यांना अजिबात खंत वाटत नाही का ?
असो !
माधुरी, अशीच माझ्या ह्या ब्लॉग ला अशीच वारंवार भेट देत जा आणि
माझ्या कविता वाचून तुझे अभिप्राय अवश्य देत रहा हि विनंती !
मनापासून धन्यवाद !!!