कधी आठवण येता
तू सामोरी दिसावं !
सर्व जगास विसरून
तू मनमोकळे भेटावं !
हातात हात घालून
दूर एकटेच फिरावं !
एकांती जवळ घेवून
ओठांस मधाळ चुंबावं !
मध्येच विनाकारण तू
माझ्यावर रुसून जावं !
लाडाने मनविता तू
खुलून घट्ट बिलगावं !
थोडं थोडं सांगावं,
अन भरपूर ऐकावं !
कधी हळुवार भांडाव
कधी मनमुराद हसावं !
सतत चोरून इतरांपासून
फोनवर बोलत राहावं !
दुसर्यास कळलेले पाहून
'अग'चे 'अरे' करावं !
विरहात मनात झुरावं
अंतरात प्रेमास जपावं !
विरोधास पुरून उरावं,
प्रेम यशस्वी करावं ...!
---संजय कुलकर्णी.
प्रेम सागराला येथे तरंग उठतात...
ReplyDeleteव्वा, साक्षात प्रभूजींचे आशीर्वाद मला लाभले !
ReplyDeleteमनापासून धन्यवाद रामचंद्र जी !!!