त्या दिवशी संध्याकाळी
नेहमी प्रमाणे ती उशिरा आली ..!
आल्या आल्या म्हणाली कशी
लवकर जायचेय, थांबायला वेळ नाही ..!
ऐकून तिचे माझी सटकली
वेड लागले अन हिच्यावर लाईन मारली ..!
मीही चिडलो बराच बोललो
आलीस कशाला मग गेलीस उडत ..!
वागण्यावर तिच्या जाम वैतागलो
तोंडे फिरवून दोघेही बसलो धुसमुसत ..!
नाही येणार ती म्हणाली
जाण्याआधी एक 'वचन दे ' गुरगुरली ..!
थांबायला तुला वेळ नाही
अन द्यायला मजकडे राहिलेच नाही !
जास्त नको मला काही
साथ दे प्रेमाने जन्मभरा साठी !
पाहून तिच्या डोळ्यातील पाणी
पारा रागाचा माझाही खाली जाई ..!
दिलेले वचन मोडत नाही
प्रत्येक जन्मात तूच माझी राणी ..!
जवळ येऊन रडू लागली
तुझ्याशिवाय सखया माझे कुणी नाही ..!
निघताना एकत्र ...मनात आले
अरे, भेटण्याचे उद्दिष्ट सफल झाले ...!!
---संजय कुलकर्णी .