
कातरवेळी सर आसवांची
पापणीतून टचकन वाहत जाई ...
तुझ्या आठवांची माळ मोत्याची
टपटपत घरंगळत ओघळून जाई ...
हळवे क्षण दोघांनी गुंफलेले
मन हेलावून थेंबातून जाई ....
त्याच वृक्षतळी दररोज माझी
पाऊले जशी आपसूक जाई ...
सांजवेळ अशीच सुजलेल्या नयनांनी
जखम तुझ्या विराहाची भळभळून जाई ...!!
-- संजय कुलकर्णी.
No comments:
Post a Comment