प्रेम नाही म्हणत
नातं तोडलं तरी ,
प्रेम माझे कधी
कमी होत नाही !
भेटू नकोस मजला
तू म्हंटलेस तरी ,
सवय लागली मनाला
तुज विसरायचे जरी !
भंगले स्वप्न प्रेमाचे
गैरसमजातून जरी एकवार ,
हटलो नाही अपयशातून
आयुष्यात मी आजवर !
अजून आहे आंस मज
हृदय परिवर्तनाची तुझ्या ग,
निराश केलेस जरी आज
मानशील प्रियसखा उद्या ग !
माझ्या खऱ्या वचनांवर
बसेल तुझा विश्वास
कधीतरी पश्चतापून स्वत:वर
वाट पाहशील हमखास ... !!!
---संजय कुलकर्णी.
No comments:
Post a Comment