
अगदी खरं अन मनातलं सारं सांगायच आहे ,
वाटत आहे असेच तरी गप्प तू बसली आहे !
नेहमी प्रमाणे स्त्री-सुलभ ' मान ' अडवतो आहे ,
चल, शेवटी लहान होऊन मीच माघार घेतो आहे !
स्वार्थ नाही माझा कठोर बोलण्यात ,
सखये हे तुला कधी समजायचे ?
खोट्या फसव्या स्तुती-सुमनांच्या मोह जाळात ,
प्रिये तू स्वत:हून का अडकायचे ?
वागलीस कशीही तरी सांग गप्प कसे मी रहायचे ,
काळजीने तुझ्या दिनरात मी का तळमळायचे ?
जीव गुंतला तुझ्यात तर का असे भांडायचे ,
रुसल्यावर तू , पुन्हा पुन्हा किती मनवायचे ?
भेटतील तुला माझ्याहून कितीतरी गोड गोड बोलणारे ,
नादी लावून प्रलोभनांनी सत्यापासून दूर भरकटविणारे !
लांब इतकी जावू नकोस कि मार्ग परतीचा विसरशील ,
मोल खऱ्या मित्राचे वेळ निघून गेल्यावर जाणशील !
---संजय कुलकर्णी .
No comments:
Post a Comment