सारं काही संपलय, असं वाटत असताना ,
'नव-वर्षाच्या' शुभेच्छा देणारा, तुझा संदेश येतो !
मन माझं दुखवून पुन्हा शुभेच्छा देण्याच्या ,
तुझ्या उद्देशाचा संशय मनात घोळत रहातो !
प्रेम न्हवतं माझं तुझ्यावर, गैरसमज तूच करून घेतलस !
क्षणात मजला सांगून असं , जगावेगळ नातं अपुलं संपवलस !
विचार नाही तेव्हा केलास, फसवून स्वत:च्या तू अंतर्मनास
वदलेल्या त्या कठोर शब्दांन, जीवनात दुख्ख किती भरलस !
सुखात राहो किंवा दुख्खात, तुला काय करायचं ?
कारणच काय अता तुला , शुभेच्छा संदेश पाठवायचं ?
---संजय कुलकर्णी.

No comments:
Post a Comment