Popular Posts

Wednesday, February 23, 2011

कवी व प्रेम कविता ... !

कवी व

प्रेम कविता ... !



कहाणी माझ्या प्रेमाची कधी,

अंतरातून विसरली जाणार नाही !

व्यथा मम अधुर्या प्रेमाची ,

शब्दात सांगता येणार नाही !


जर फसविले नसते कोणी,

तर झाला नसता कवी कोणी !

अन लिहिल्या नसत्या कविता कोणी,

जर आठविल्या नसत्या तिच्या आठवणी !


असे म्हणतात कि, प्रेम केले ज्यांनी कोणी,

त्यांनाच समजतात, लिहिल्या प्रेमकविता जर कोणी !

वय वाढले तरी असतो जो मनातून प्रेमी,

पाहताच सुंदर ललना गाईल तोच प्रेम गाणी... !!

---संजय कुलकर्णी.

महत्वाची टीप :-

कोणी फसविले तरच कवी होतो

हे मला सुद्धा पटत नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावे .

No comments:

Post a Comment