कवी व
प्रेम कविता ... !
कहाणी माझ्या प्रेमाची कधी,
अंतरातून विसरली जाणार नाही !
व्यथा मम अधुर्या प्रेमाची ,
शब्दात सांगता येणार नाही !
जर फसविले नसते कोणी,
तर झाला नसता कवी कोणी !
अन लिहिल्या नसत्या कविता कोणी,
जर आठविल्या नसत्या तिच्या आठवणी !
असे म्हणतात कि, प्रेम केले ज्यांनी कोणी,
त्यांनाच समजतात, लिहिल्या प्रेमकविता जर कोणी !
वय वाढले तरी असतो जो मनातून प्रेमी,
पाहताच सुंदर ललना गाईल तोच प्रेम गाणी... !!
---संजय कुलकर्णी.
महत्वाची टीप :-
कोणी फसविले तरच कवी होतो
हे मला सुद्धा पटत नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावे .
No comments:
Post a Comment